जळगाव,(प्रतिनिधी)- संपूर्ण राज्यभरात कोरोना संसर्गाची असलेली दुसरी लाट आता ओसरत असून राज्यातील काही गावं आता कोरोना मुक्तीकडे तर बहुतांश जिल्ह्यामध्ये कोरोना कमी होतांना दिसत आहे.तर चार पाच जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण वाढत आहे.अशी परिस्थिती असली तरी जिथे रुग्ण संख्या ओसरली आहे किमान तिथे आता निर्बंध शिथिल व्हावे अशी मागणी सर्व स्तरातून होतं आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात निर्बंध हटवण्याची आणि मुंबईतील लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली करण्या संदर्भात निर्बंध शिथिल करण्यात येतील का? या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
राज्यात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय होऊ शकतो
या बैठकीनंतर मुख्यमंत्री राज्यातील निर्बंध शिथिल करण्याच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निर्बंध शिथिलचा निर्णय झाल्यास राज्यात बहुतांश ठिकाणी अनलॉक होईल.